News

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन जाहीर – हे आहेत नवीन नियम

महाराष्ट्रात उद्या (२२ एप्रिल ) रात्री ८ वाजल्या पासून कडक लॉकडाऊन जाहीर हे आहेत नवीन नियम 👇

१. आता लग्न सभारंभ फक्त २५ जणांच्या उपस्थितीत करता येतील तेही २ तासाच्या आत आणि जर नियमांच उल्लंघन केलं तर ५० हजाराचा दंड आकारला जाईल

२. किराणा भाजीपाला फक्त सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहील

३. आंतरजिल्हा आणि आंतरशहर वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवा साठी सुरू राहील.

४. जर का आजारी पेशंटला ट्रीटमेंट साठी जायचं असल्यास त्यासोबत एक व्यक्ती जाऊ शकतो. तो नियम वृद्धांसाठी सुद्धा असेल.

५. फक्त अत्यावश्यक लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी.

६. अत्यावश्यक लोकांनाच बस आणि ट्रेनने प्रवास करता येईल. खाजगी वाहन सुद्धा आत्यावशक सेवांसाठी सुरू राहील

७. सामान्यांना लोकल मेट्रो बस प्रवास बंद

८. खाजगी सहकारी कार्यालये १५% उपस्थितीत सुरू राहील.

९. होम quarantine नागरिकांच्या हातावर शिक्का बंधन कारक असेल.

१०. Lockdown चा नियम मोडल्यास दंड आकारण्यात येईल.

Super Marathi

SuperMarathi या साईट वर तुम्हाला मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी https://www.supermarathi.xyz वर बनून रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button